You are currently viewing मुंबई

मुंबई

*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, निवेदिका, कथाकार पर्यावरण प्रेमी अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मुंबई*

 

मुंबई मुंबई

आपली मुंबई

काय सांगू बाई

तिची नवलाई

 

 

ढगापर्यंत घरे

सुसाट वारे

लांबच लांब रस्ते

माणसांचे लोंढे

 

 

सर्वांचीच धावपळ

सारखी पळापळ

मोटारगाड्या लोकल

सुटलेल्या भरधाव

 

 

समुद्राच्या काठी

हिऱ्यासारखी लखलखणारी

आपली मुंबई

होत चालली विद्रूप

 

 

रोजच तिच्यावर

आदळत आहेत

माणसांचे लोंढे

होत आहे चेंगराचेंगरी

घातपात गुन्हे

 

 

मुंबई मुंबई

आपली मुंबई

देशाची शान आहे

महाराष्ट्राचा मान आहे

 

 

आपण मुंबईला

जपलं पाहिजे

वैभव परत

आणलं पाहिजे

 

अनुपमा जाधव

प्रतिक्रिया व्यक्त करा