*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आठवणींच्या हिंदोळ्यावर!*
आठवणींच्या हिंदोळ्यावर ऊगाच बसती,
स्मृती पांखरे तिथेच फेर धरती,
भुतकाळची स्वप्न पाखरें ,
नयनांमधे पाणी भरती,
मनी अबोल प्रीत फुलली होती,
जीव घाबरे परि हे गुज व्यक्त न होई,
कोणास सांगू कसे सांगु करता,
मनी काहुर अन् वेळ निघुन जाई.
आठवणींच्या हिंदोळ्यावर ,
मैत्रीणींच्या गंमती जंमती,
अलगद हंसवत झुलत रहाती,
आता गलबले जीव परि ,
फिरून परत कधी न येती.
आठवणींच्या हिंदोळ्यावर,
मीच मग आठवत राही,
लग्न मुले आणि संसार,
ऊगाच मी त्यात स्वत:ला पाही.
अनुराधा जोशी
अंधेरी. मुं. 69
9820023605

