*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।
___________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ९६ वे
अध्याय – १६ वा , कविता- ६ वी
___________________________
आनंदाने भाऊ कवर बोलला । भावयजयीस म्हणाला ।
कर सुरुवात स्वयंपाकाला । कांदा,भाजी आंबड्याची । भाकरी, ऊन पिठले हिरवी मिर्ची, देईन स्वामीला ।। १ ।।
भावजयीने शिदोरी करून दिली । भाऊ गेला स्टेशनावरी।
बाराची गाडी चुकली । स्वारी भाऊंची उशिरा शेगावी पोंचली।।२ ।।
कवराच्या जीवा लागला घोर । परी नशीब पहा किती थोर।
वाट पहात बसले होते त्याची गुरूवर । मठामध्ये ।। ३ ।।
भाऊची शिदोरी स्वामींनी ग्रहण केली । प्रसाद म्हणून भाऊस दिली । स्वामींची थोरवी पटली। त्या समयी सकलांना ।। ४ ।।
कृपा असू द्या स्वामी,भाऊ वदला । स्वामींनी त्यास आशीर्वाद दिला । भाऊ डॉक्टर झाला । स्वामी कृपेने ।।५।।
तुकाराम माळी भाविक फार । येतसे दर्शना वारंवार ।
स्वामी भेटीचा आनंद त्यास फार । भक्त हा स्वामींचा ।।६।।
शेतामध्ये तुकाराम होता बसलेला । अवचित प्रकार घडला ।
शिकाऱ्याने सश्यावर नेम धरला । त्यातील छरा एक लागला तुकारामाला ।७ ।।
छरा लागलेला । मस्तकात शिरला । तुकाराम त्रासला।
असह्य वेदनेने ।। ८ ।।
मठात त्याने सेवा सुरू केली । सेवा त्याची फलद झाली ।
शुद्ध भावना मनातली । जाणुनी, स्वामींनी कृपा केली ।। ९ ।।
निष्ठेचे उदाहरण असे । तुकाराम माळ्या जसे । मनावर ठसे । सकल जनांच्या ।। १० ।।
*******
।। इति १६ वा अध्याय समाप्त ।।
*******************
अध्याय- १७ वा होईल आरंभ..
करी क्रमशः लेखन कवी अरुणदास
__________________________
कवी अरुणदास- अरुण वि. देशपांडे -पुणे.
___________________________
