*ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, संपादक बाबू फिलिप्स डिसोजा लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्रज्ञा सूर्य*
शहरे खेड्यांमधून उसळला निळा जनसागर
निळे अंबर, निळा सागर या भारत भूमीवर
जय भीम चा देत नारा जनता झाली एक स्वर
एक त्राता विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर
-१-
संविधान देशाचे दिले महामानवाने उपकार
स्वातंत्र्य, समता, बंधूता त्रिसूत्री याचा मंत्र आधार
प्रज्ञा सूर्य तळपला मिटला अज्ञानाणा अंधःकार
नत झाली कोटी शिरे अंतरी कृतज्ञता अपार
-२-
शिका, संघटीत व्हा नि अन्यायाविरुद्ध करा एल्गार
आदर्श नव युवकांचे नव समाजाचे झाले अंगार
शतकांची अढी कसली विसरा मनातला विखार
सूक्ष्म अंतराय सुशिक्षितांचा तो बेकीचा व्यवहार
-३-
तोडा फोडा राजनीती ने केला भेदभाव जातींवर
झुंजू नका आपसात ओऴखा कावा तुम्ही वेळेवर
अस्मिता अनाठायी नका करू उगाच भाव आपपर
दीनदुबळ्यांचे कैवारी कर्तृत्वाने जाहले अमर
-४-
बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
द्वारा डॉक्टर साई प्रसाद कुमठेकर
अनिका पिकॅडिली
ए-५०३
पुनावळे बाजार, पुनावळे, पुणे ४११०३३
मो. 9890567468