*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्मा सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*करि धरियेली*
शब्दांचे सूर्य जेव्हा
लेखणीची ताकद बनतात |
विश्व शस्त्रास्त्रे तेव्हा
अप्रतिम अक्षर बनतात ||१||
लिहित्यांचे शब्दास्त्र
दुधारी विलसत असते |
विश्व बदलण्याचे
सामर्थ्य खास त्यात असते ||२||
अविचाराग्नीत पडते
विश्व संहाराची ताकद ठेवते |
विनाशकाले असे
विवेकालाच कसे जाळते ||३||
लिहिण्याआधी वेचून
अखंडीत साहित्य वाचावे |
सुखेनैव वाचलेले
जन हितार्थ शुद्ध लिहावे ||४||
जया करि झरणी
मनी शुद्ध विचार धर्म |
करी सहाय्य लेखणी
अचूक भेदण्यास अधर्म ||५||
कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.
फणसखोल, आसोली, ता. – वेंगुर्ला,
जि.- सिंधुदुर्ग, राज्य- महाराष्ट्र.