*एक करायला गेलं तर,*
*एक राहूनच जातं.*
*सकाळी फिरायला गेलं तर,*
*साखरझोपेचं सुख राहून जातं .*
*शांततेने पेपर वाचू लागलो तर,*
*पूजा, प्राणायाम राहून जातो .*
*दोन्ही साधायचा प्रयत्न केला तर,*
*नाश्ताच राहून जातो .*
*धावपळ करत सगळं केले तर,*
*आनंद हरवतो .*
*डायट फूड मिळमिळीत लागतं,*
*चमचमीत खाल्लं तर वजन वाढतं .*
*एक करायला गेलं तर,*
*एक राहूनच जातं.*
*नोकरीसाठी कुटुंब सोडायचं नाही,*
*पण कुटुंबासाठी नोकरी हवी.*
*दोन्ही सोडायच्या कल्पनेने*
*भिती वाटायला लागते .*
*लोकांचा विचार करता करता,*
*मन दुखावतं,*
*मनासारखं वागायला गेलो तर,*
*लोक दुखावतात .*
*एक करायला गेलं की,*
*एक राहूनच जात*
*घाईगडबडीने निघालो तर,*
*सामान विसरते,*
*सावकाश गेलो तर,*
*उशीर होण्याची भीती वाटते.*
*सुखात असलो की,*
*दुःख संपतं, आणि*
*दुःखात असलो की,*
*सुख जवळ फिरकत नाही.*
*एक करायला गेलं की,*
*एक राहूनच जातं .*
*पण या काहीतरी राहून जाण्यातच,*
*खरा जीवनातील आनंद आहे.*
*काहीतरी मिळाल्याचे समाधान आहे.*
*कारण बाळ जन्मल्याबरोबर,*
*त्याच्या रडण्यात आनंद आहे,*
*आणि अचानक दुरावलेली व्यक्ती,*
*कित्येक वर्षांनी भेटल्यावर,*
*आनंदातही रडणे आहे.*
*कधी रडण्यातही आनंद मिळतो,*
*तर कधी आनंदातही रडता येतं.*
*ज्याला या कुठल्याच गोष्टीचे*
*काही विशेष वाटत नाही*
*तो माणूस नाही,*
*तर यंत्रच आहे.*
*म्हणून आनंदाने*
*भरभरून जगून घेऊ या .*
*आजचा दिवस आहे*
🌹🙏🌹
*संग्रह अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी*