You are currently viewing श्रीराम निघाले वनवासाला

श्रीराम निघाले वनवासाला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ स्मिता श्रीकांत रेखडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*श्रीराम निघाले वनवासाला*

 

दशरथ कौसल्येचा रघुकुल भूषण

आनंदात प्रजा वसे अयोध्या नगरी

राज्याभिषेकाचा क्षण समीप आला

हर्षाने उजळीत सजली अवधपुरी ||१||

 

दासी मंथरा कैकयीस स्मरण करीता

रामास घडावा चौदा वर्षे वनवास

वरदानाने भरतास मिळावे राज्य

शोक अनावर जाहला दशरथास ||२||

 

आज्ञा घेऊनी श्रीराम निघाले वनवासाला

राजवस्त्र त्यागुनी तमसा नदी किनारी

सीता,लक्ष्मणा सह कुटी दंडकारण्यी

निरोप देई शोकाकुल अयोध्या नगरी ||३||

 

श्रीरामास विनवी व्याकुळ बंधु भरत

नको मज राजगादी धरोनी राम चरण

पादुका ठेवुन पाहे बंधु राज्यकारभार

उर्मिला होई कष्टी आला वियोगाचा क्षण ||४||

 

आज्ञाधारक राम सीता होई वनवासी

रक्षण करण्या सावली बंधु लक्ष्मणाची

वियोगाने उर्मिलेचे नेत्री अश्रु ओघळले

देता निरोप व्याकुळ जनता अयोध्येची ||५||

 

रामाच्या पदस्पर्शाने होई अहिल्या उध्दार

यज्ञात विघ्न आणता केले असुर निवारण

अभिलाषा धरी मनी केले विद्रूप शुर्पणखा

कांचन मृगाची भुरळ पडता घडले रामायण ||६||

 

सौ. स्मिता श्रीकांत रेखडे.नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा