जिल्ह्यात मनाई आदेशामुळे स्पर्धा १२ एप्रिलला होणार
सावंतवाडी / न्हावेली :
न्हावेली येथील आनंद नाईक मित्रमंडळाच्या वतीने शनिवारी, २९ रोजी होणारी बैलगाडी शर्यत जिल्ह्यात मनाई आदेश असल्यामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
स्पर्धा त्याच ठिकाणी १२ एप्रिलला होणार आहे. याची सर्व क्रीडारसिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आनंद नाईक मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.