*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।
___________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ९१ वे
अध्याय- १६ वा , कविता – १ ली
___________________________
गजानन विजय ग्रंथाचे वाचन करावे। त्याचे चिंतन करावे । कल्याण साधावे । स्वतःचे ।। १ ।।
बघा या ग्रंथात । हर अध्यायात । श्री गजाननाचे दर्शन साक्षात । घडेल श्री दासगणूच्या शब्दातूनी ।।२ ।।
स्वामी गजानन । करिती कसे भक्त कल्याण । वाचावे असे अनेक क्षण । गजानन विजय ग्रंथात ।। ३ ।।
पुंडलिक मुंडगावीचा । भक्त एक श्री गजाननांचा । भाव होता त्याचा । श्री गजाननाप्रति ।। ४ ।।
पुंडलिकाच्या गावची भागाबाई । फार दांभिक ही बाई ।
भाविकांना बनवे ही बाई । भरवी बाजार दंभाचा ।।५।।
बोले भागाबाई पुंडलिकास । तू का जातो शेगावास ?।
मानू नको गुरू गजाननास । येत नसे काही त्यास ।। ६ ।।
भ्रष्ट आचरणी असे गजानन। देऊ नको त्यास गुरूचा मान।
कळे ना तुज, तू लहान । ऐक माझे पुंडलिका ।।७ ।।
गिन गिन गणाते “भजन । हे बोलतसे गजानन । कसले हे आचरण ? । बोले भागाबाई ।।८ ।।
त्याने मंत्र तुज ना दिला । विधी ना काही झाला । मग हा
तुझा गुरू कसा झाला ?। सांग तू पुंडलीका ।। ९ ।।
__________________________
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
__________________________
कवी अरुणदास – अरुण वि. देशपांडे – पुणे.
___________________________