पुणे (प्रतिनिधी) :
समाजाचे आज विद्रुपीकरण झाले असून समाजाची जागृती करण्यासाठी लेखकांनी भूमिका घेत लेखन केले पाहिजे तरच समाज सुधारेल असे मत साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. पुण्याच्या साहित्य सम्राट बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या बहुभाषिक द्विशतकी साहित्य संमेलनामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष थोर विचारवंत श्रीपाद सबनीस प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कै. रामचंद्र बनकर इंग्लिश स्कूल गंगानगर हडपसर येथे आचार्य रतनलाल सोनग्रा यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन संपन्न झाले. संमेलनाचे उद्घाटक प्रशांतदादा जगताप, वैशालीताई बनकर, सुनील बनकर, संमेलनाध्यक्ष रतनलाल सोनग्रा, म.भा.चव्हाण, बबन पोतदार, कवी संमेलनाध्यक्षा प्रतिभाताई मगर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सबनीस पुढे म्हणाले की आज राजकारण अर्थकारण आणि धर्मकारणही विद्रुप व दूषित झाले आहे. साहित्यिकांनी राजकारण्यांसाठी सडेतोडपणे लेखनातून विचार मांडण्याची भूमिका ध्यावी. आज समाजातील संस्कृतीचे विद्रुपीकरण झाले असून समाजाच्या शुद्धीकरणासाठी साहित्यिकाची नैतिकतेती भूमिका घेतच सत्याची, माणुसकीची भूमिका लेखनातून मांडली पाहिजे. अन्याया विरुद्ध लढण्याची भूमिका ही साहित्यिकांची असलीच पाहिजे. महापुरुषांनी सत्याचे जागरण आणि समाजाचे प्रबोधन केले तीच परंपरा साहित्य सम्राटचे सर्वेसर्वो असणारे विनोद अष्टुळ यांनी साहित्य सम्राटच्या माध्यमातून ऐतिहासिक भूमिका पार पाडत तुमच्या आमच्यापर्यंतसाहित्यातून समाज जागृती पोहोचवत आहेत. आज स्वारगेट बलात्कार सारख्या घटनेवरसुद्धा राजकारण्याकडून व व्यवस्थेकडून असंवेदनशील भाषा ऐकायला येते त्यासाठी साहित्यिकांनी यावरती कथा कविता कादंबरी यातून सत्यनिष्ठ विचार लिहिले पाहिजे. मानवता आणि सत्यशोधक ध्येयवादाला अर्पण करणारा हा अष्टुळ यांचा साहित्यसम्राट मंच आहे. याद्वारे महापुरुष आणि संतांचे हे जीवित कार्य आहे. संमेलनाचे अध्यक्ष रतनलाल सोनाग्रा म्हणाले की आपण साहित्यिकानी लेखनातून क्रांती केली पाहिजे. आज समाजाला क्रांतीच्या विचाराची गरज आहे. विद्रुपी जगाला जागृत करण्यासाठीच लेखकानी साहित्यकृती द्वारे क्रांती केली तरच समाजातील विद्रुपीकरण नष्ट होत समाज सुंदर होईल.
संमेलनाची सुरुवात ढोल लेझीम आणि पारंपारिक वाद्यांच्या संगतीत ग्रंथ दिंडी जल्लोषात झाली. विद्यार्थ्यांच्या मंचावरील भव्य सांस्कृतिक कार्यक्रमानंतर संविधान ग्रंथाची पूजा, संविधानाचे शपथ घेण्यात आली. द्विशतकी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
विनोद अष्टुळ त्यांना कलाजीवन बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्यातर्फे डॉ.अलका नाईक मुंबई यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला.
समाजात नाविन्यपूर्ण कार्य करून समाजात ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना साहित्यसम्राट चे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात ग्रामीण कथाकार बबन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन पार पडले. त्यामध्ये प्रा. अशोक शिंदे यांनी ‘पाटलानं इटीला पळवलं’ एकपात्री विनोदी कथा तर पोतदार यांनी ‘बकू मावशी’ ही हृदय स्पर्शी कथा ऐकून रसिकांना मंत्रमुक्त केले.
ज्येष्ठ कवयित्री प्रतिभाताई मगर यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक सुप्रसिद्ध कवींच्या मराठी हिंदी इंग्रजी कवितांनी अविस्मरणीय असे दोनशे वे राज्यस्तरीय कवी संमेलनात ऐन उन्हाळ्यातही काव्यधाराचा वर्षावाची बरसात अधिकच बहरली. या कवी संमेलनामध्ये दिग्गज कवी बा.ह.मगदूम, प्रवीण खोलंबे, महेंद्र माणिक, सुरेश लोखंडे, सारिका सोमजे, शिवाजी उराडे, डॉ. अनिता जठार, ऐश्वर्या डगावकर इंदोर, सदानंद माळी सांगली, शौकत मुलांनी बार्शी, सुभा लोंढे, लक्ष्मण शिंदे भोर, इंदिरा पूनावाला, विद्या सराफ, अलका नाईक मुंबई, माणिकराव गोडसे, राहुल भोसले,गोरख पालवे, निरंजन ठणठणकर, दशरथ दोन भाऊ, नंदकिशोर ठोंबरे नाशिक, वैशाली शितोळे दौंड, श्रुतेश पाटील बालकवी, बबन सूर्यवंशी, डॉ.पांडुरंग बाणखेले, विजय सातपुते, जयश्री नांदे, गीता लंघे अशा, नव्वद कवी कवियत्री आपल्या आशयघन कविता सादर करतच सभागृहातील रसिकाना मत्रमुंग्ध केले.
कवी कवयित्रींना आकर्षक सन्मानचिन्ह आणि दोन द्विशतकी संमेलनाची स्मरणिका देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरयू पवार, कांचन मून, कविता काळे, बाळासाहेब गिरी यांनी तर आभार नानाभाऊ माळी व प्रा.बाबासाहेब जाधव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने संपन्न झाली.