You are currently viewing श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ८५ वे

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ८५ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।

___________________________

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ८५ वे

अध्याय – १५ वा , कविता – १ ली

___________________________

 

स्वामी श्री गजानना । तव चरणी प्रार्थना । उमज पडू द्या मना । घडवा मनासी गजानना ।। १ ।।

 

शिव जयंती उत्सवाला । टिळक बाळ गंगाधर आले अकोल्याला । अध्यक्ष तेच लाभले सभेला । थोर राष्ट्रभक्त जे ।। २ ।।

 

अकोल्यास टिळक येती । अफाट जन सभेस जमती ।

लोकमान्यांची कीर्ती । ठाऊक सर्वांना ।।४ ।।

 

काही जण म्हणाले । होईल खूप चांगले । आमंत्रण उत्सवाचे स्वामींना द्याया भले । जाऊ शेगावी आपण ।।५।।

 

यावर सहमती होईना । काही बोले- नका बोलावू स्वामींना।

त्यांचे वागणे कधी कसे,कळेना । विपरीत घडले तर कसे ?।। ६।।

 

तरी काही जण शेगावस गेले । स्वामींना भेटले । सभेबद्दल

बोलले । म्हणाले- स्वामी आपण यावे सभेसी अकोल्यास ।।७।।

 

म्हणे-स्वामी,पाहण्या टिळकांना । आणिक अण्णा पटवर्धनांना। भेटण्या या दोघांना । येऊ आम्ही अकोल्यास ।।८ ।।

 

खापर्डेना आनंद झाला । ते बोले कोल्हटकराला। बघा,

स्वामींनी वृत्तांत जाणला । अकोल्यात जो जाहला ।९।।

*********

क्रमशः करी हे लेखन कवी अरुणदास

__________________________

कवी अरुणदास- अरुण वि. देशपांडे- पुणे.

___________________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा