You are currently viewing अवकाळी पाऊसाने झालेल्या भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याबाबत.

अवकाळी पाऊसाने झालेल्या भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याबाबत.

अवकाळी पाऊसाने झालेल्या भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याबाबत.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना निवेदनाद्वारे मागणी

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊसाने भातशेतीचे फार मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच अडचणीत असलेला जिल्ह्यातील शेतकरी या आस्मानी संकटाने मेटाकुटीस आला आहे. तरी आचारसंहितेचा कोणताही बाऊ न करता या झालेल्या नुकसानीचे तातडीने व योग्य पध्दतीने पंचनामे करावेत व अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न करावेत अशी विनंती काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा