You are currently viewing अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भात पिकांचे तात्काळ पंचनामे करा…

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भात पिकांचे तात्काळ पंचनामे करा…

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भात पिकांचे तात्काळ पंचनामे करा…

जिल्हा शेतकरी संघटनेची मागणी; तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर…

वेंगुर्ले

सततच्या पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे भातपिकाचे नुकसान होऊन शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे शेतीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने आज वेंगुर्ले तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, गेले ७ ते ८ दिवस सततच्या पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे पिकांना खुटवा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरी शासनाने विमा कवच आधार म्हणून दिलेले असले तरी कोणतेही निकष न लावता शेतकऱ्यांचे भात पिकांचे सरसकट पंचनामे करावे.

हे निवेदन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शामसुंदर राय, प्रीतम सावंत, अर्जुन नाईक, सुयोग नाईक, राजेश बेहेरे, संदीप देसाई या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी व वेंगुर्ले तहसीलदार यांना हे दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा