You are currently viewing विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले 

विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले 

२० नोव्हेंबरला मतदान; २३ ला मतमोजणी

 

सिंधुदुर्ग :

अखेर महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेचे बिगुल वाजले. आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभेची निवडणूक होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. निवडणूक जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू झाली असून विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या निवडणुकीची घोषणा केली आहे.

निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत २२ ते २९ ऑक्टोबर असून ३० ऑक्टोबरला छाननी होणार आहे. ४ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा