You are currently viewing आरक्षणाचे खरे मारेकरी काँग्रेस पक्ष – भाजपा जिल्हा सरचिटणीस शारदा कांबळे यांची टीका

आरक्षणाचे खरे मारेकरी काँग्रेस पक्ष – भाजपा जिल्हा सरचिटणीस शारदा कांबळे यांची टीका

आरक्षणाचे खरे मारेकरी काँग्रेस पक्ष – भाजपा जिल्हा सरचिटणीस शारदा कांबळे यांची टीका

राहुल गांधीची भुमिका दुटप्पी : आरक्षण विरोधकांचे जनताच पानिपत करेल

आरक्षण बचाव रॅलीत सर्वांनी सहभागी व्हा : शारदा कांबळे यांचे आवाहन

वैभववाडी  :

आरक्षणाचा खरा मारेकरी काँग्रेस पक्ष आहे. आरक्षण देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत काँग्रेसनेच पराभूत केले होते. हा इतिहास आजही जिवंत आहे. देशातील दुर्बल घटकांना दिलेले आरक्षण संविधानात्मक अधिकार आहे. त्यामुळे आरक्षण संपविण्याची भाषा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी करू नये. आरक्षण ही काय खाजगी मालमत्ता नाही. आरक्षण संपविण्याचा प्रयत्न झाल्यास आरक्षणवादी जनता त्यांचे पानिपत करेल अशी टीका भाजपा महिला जिल्हा सरचिटणीस शारदा कांबळे यांनी केली आहे. ५ ऑक्टोबर ला होणा-या आरक्षण बचाव रॅलीत मोठ्या संख्येने सर्वांनी सहभागी व्हावे. असे आवाहनही शारदा कांबळे यांनी केले.

राज्य घटनाकारांनी आरक्षणाचा मुद्दा राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्याचा मूळ उद्देश देशात आर्थिक, सामाजिक व राजकीय समानता यावी हा होता. आजही देशातील दुर्बल घटकांना आरक्षणाची गरज आहे. मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत.

काँग्रेसने आपल्या सत्ता कालावधीत देशात किती समानता आणली. काँग्रेस पक्ष हा जातीयवादी पक्ष आहे. त्यांनी प्रथम आपले आत्मपरीक्षण करावे. खुद्द घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने निवडणुकीत पराभूत केले. हा इतिहास आजही जिवंत आहे. काँग्रेसने आपल्या सत्ता कालावधीत ओबीसी, धनगर व मराठ्यांना आरक्षण दिले नाही. खरे तर आरक्षणाचे मारेकरी हा काँग्रेस पक्ष आहे. म्हणून जनतेने त्यांना जागा दाखवली. सत्तेपासून त्यांना दूर ठेवले आहे. अशी टीकाही शारदा कांबळे यांनी केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा