You are currently viewing काव्यपुष्प – ५९

काव्यपुष्प – ५९

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण वी देशपांडे लिखित श्री गजानन विजय काव्यांजली*

 

गण गण गणात बोते ll जय गजानन ll

 

 *काव्यपुष्प – ५९*

अध्याय – १० वा, कविता – ५ वी 

—————————————–

बंकटलालाने समजावले l ते सर्वांना पटले l एकमताने पुढे ठरले l मठ बांधण्याचे ll १ ll

 

भास्कर , बाळाभाऊ ,पितांबर सोबती l रामचंद्र गुरव,

गणेशअप्पा गाव याचे उमरावती l तत्पर सेवेत हे चौघे सेवेत स्वामींच्या ll २ ll

 

आली होती बाळाभाऊस विरक्ती l म्हणून वेगळी त्याची वृत्ती l केली त्यास भास्कराने सक्ती l भाषा त्याची अहंकाराची ll ३ ll

 

भास्कराचे हे वागणे पाहिले l स्वामींना नाही ते आवडले l

त्यांनी मग एक केले l भास्करास उमजण्यासाठी ll४ ll

 

बाळा भाऊला स्वामी मारती l छत्रीने, काठीने झोडीती l

मग त्यास तुडविती l माती जैसा ll ५ ll

 

पाहून सारे भयभीत होती l बंकटा, कृष्णाजीला बोलाविती l

दोघे स्वामींना विनविती l नका मारू भक्त भास्कराला ll६ll

 

ऐकून समर्थ हसले l म्हणे,ऐसे काही नाही झाले l

मग,बाळाभाऊस म्हणाले l बाळा, दाखिव रे सर्वांना ll७ll

 

सर्वांनी बाळा भाऊस पाहिले l त्यास काही नव्हते झाले l

तेव्हा खरे काय ते भास्करा कळाले l भक्त बाळाभाऊ खरा ll८ ll

—————————————

करी क्रमशः लेखन कवी अरुणदास

—————————————–

कवी – अरुणदास, अरुण वि. देशपांडे – पुणे

—————————————–

,

प्रतिक्रिया व्यक्त करा