You are currently viewing 12 ते 14 ऑगस्ट कालावधीत जिल्ह्यात जनता दरबार..

12 ते 14 ऑगस्ट कालावधीत जिल्ह्यात जनता दरबार..

सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न; पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

 

ओरोस :

 

जिल्ह्यातील नागरिकांचे समस्या सुटाव्यात तसेच त्यांचे मूलभूत प्रश्न निकाली लागावे यासाठी कणकवली, कुडाळ, सावंतवाडी मतदार संघात जनता दरबार 12, 13, 14 ऑगस्ट या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत नवीन जिल्हा नियोजन समिती सभेत होणार असल्याची माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

प्रत्येक विभागाचे अधिकारी या जनता दरबाराला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कणकवली मतदारसंघ 12 तारखेला, कुडाळ मतदारसंघ 13 तारखेला व सावंतवाडी मतदारसंघ 14 तारखेला हा जनता दरबार होणार आहे. नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात प्रत्येक खात्याचे टेबल लावले जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. समस्या घेऊन येणाऱ्या व्यक्तीची आणि त्यांचे समस्येची नोंदणी करण्यात येणार असून तो प्रश्न निकाली निघेपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जाणार आहे. तरी नागरिकांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा