You are currently viewing काव्यपुष्प -५० वे

काव्यपुष्प -५० वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि. देशपांडे लिखित श्री गजानन विजय काव्यांजली*

 

*काव्यपुष्प – ५० वे*

अध्याय – ९ वा, कविता – २ री

—————————————–

श्री संत गजाननाचा सहवास । लाभला शेगावास । कृपा सर्वांवरी खास । असे स्वामींची ।। १ ।।

 

श्री गजाननाला। गोविंदबुवा मळ्यात येती भेटायला । पाहुनी सोबत घोडयाला । आणले इथे याला कशाला ? । लोक विचारती ।। २ ।।

 

गोविंदबुवा बोलले । चिंतेचे कारण ना आता उरले । घोड्यास शहाणे केले । काल साक्षात समर्थांनी ।। ३ ।।

 

शेगावी यात्रेकरू येती । स्वामी दर्शन, हेतू चित्ती । नवस मनीचा फेडीती । स्वामींच्या समोरी ।।४ ।।

 

बाळापूरच्या दोन व्यक्ती । नित्य दर्शना शेगावी येती ।

दरवेळी विसरती । आणण्या जिन्नस नवसाचा ।।५ ।।

 

गजानन बोलती भास्करा । तू इकडे पहा जरा । लोक काही

बोलती नवस खरा । परी जाती विसरून नवस जो केला ।।६।।

 

स्वामी म्हणती- मनी असावी निर्मळता । बोलण्यात सत्यता । तरच शब्दात येईल मौलिक ता । जी आवडते भगवंता ।।७।।

 

बाळापूरच्या त्या दोघांना । बोल स्वामींचे कळाले मना ।

स्वामी बोले- त्यांना । बोलण्यात ठेवा मेळ रे ।।८ ।।

———

क्रमशः करी लेखन कवी अरुणदास ।।

—————————————–

-अरुण वि.देशपांडे-पुणे

—————————————–

प्रतिक्रिया व्यक्त करा