You are currently viewing आरोपी हा कुठल्या जाती, धर्माचा नसतो…

आरोपी हा कुठल्या जाती, धर्माचा नसतो…

आरोपी हा कुठल्या जाती, धर्माचा नसतो…

अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांचे मत;  असलदे येथे हिंदू व मुस्लीम समाजबांधवांची शांतता बैठक..

कणकवली

आपल्या देशात महिला सुरक्षित राहण्यासाठी शासनाचे कडक कायदे आहेत. एखाद्या महिलेने आपल्या सुरक्षिततेसाठी पोलीस स्थानकात फिर्याद नोंदवल्यास त्यावर कारवाई करणे हे पोलिसांचे काम आहे. तक्रारीनंतर आरोपी जर पीडीत महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. नांदगाव दशक्रोशीतील हिंदू व मुस्लिम समाजातील प्रमुखांनी मांडलेल्या भूमिकेवरून याठिकाणी एकोप्याने राहणारी माणसे आहेत, असे चित्र आहे. कुठल्याही गुन्ह्यातील आरोपी हा आरोपीच असतो तो कुठल्याही जाती, धर्माचा नसतो, असे मत अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी व्यक्त केले.
असलदे येथील गौरीमंगल कार्यालय येथे हिंदू व मुस्लिम धर्मातील शांतता कमिटीची बैठक श्री. रावले यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी घनःश्याम आढाव, पोलीस निरीक्षक समशेर तडवी, पोलीस किरण मेथे, चंद्रकांत झोरे, मंगेश बावदाने, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, उपसरपंच सचिन परब, कोळोशीचे सरपंच गुरुनाथ आचरेकर, तोंडवली बावशीच्या सरपंच मनाली गुरव, असलदेचे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके, व्हाईस चेअरमन अतुल सदडेकर, दयानंद हडकर, दिलीप फोंडके, दाजी सदडेकर, सुभाष बिडये, संजय पाताडे, प्रदीप हरमलकर, तात्या निकम, हेमंत कांडर,पप्पी सापळे, नीलेश तळेकर, नांदगाव तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू तांबे, नामदेव वाडकर, देवेंद्र हडकर, रघुनाथ लोके, मुस्लिम समाज अध्यक्ष अहमद बटवाले (पटेल), दर्गा समिती अध्यक्ष शकील बटवाले, रज्जाक बटवाले, उमर नावलेकर, शहाबुद्दीन साटविलकर, माजी सैनिक गवस साटविलकर, अल्लाउद्दीन बोबडे, जाफर कुणकेरकर आदींसह उपस्थित होते.

कृषिकेश रावले म्हणाले, स्त्रियांसाठी सुरक्षा महत्त्वाची आहे, आम्ही खाकी वर्दी घातली की नागरिकांना सुरक्षा देणे हे आमचे कर्तव्य आहे. तो हक्क कोणीही काढू शकत नाही. या परिसरात घडलेल्या प्रकारांबाबत समाजातील दोन्ही घटकांनी जागृत होण्याची गरज आहे. आपल्या मुलांवर पालकांनी लक्ष ठेवले पाहिजे कुणालाही तक्रार करावयाची असल्यास पोलीस स्टेशनच्या कार्यालयाचे दरवाजे आपल्यासाठी केव्हाही खुले आहेत. वाईट प्रकाराबांत आम्हाला कळवल्यास याची पोलीस यंत्रणा दखल घेईल, असे त्यांनी सांगितले.
हिंदू-मुस्लीम समाजातील नागरिकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. दोन्ही समाजांमध्ये कुठल्याही गोष्टीत जातीय तेढ निर्माण होणार नाही, असे समरेश तडवी यांनी सांगितले. बैठकीत कृषीकेश रावले, घनःश्याम आढाव, समशेर तडवी यांचा दोन्ही समाजातील प्रमुखांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी दोन्ही समाजातील प्रमुखांनी बैठकीत आपापले मुद्दे मांडले. त्यानंतर जे झालेले प्रकार आहेत. त्याबाबत दोन्ही समाजाची कमिटी गटीत करुन त्यावर चर्चा करुन संवादाने मार्ग काढण्यात येतील, असे ठरवण्यात आले. बैठकीला नांदगांव दशक्रोशीतील हिंदू व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा