You are currently viewing कवी सर्जेराव चव्हाण यांना ‘ राष्ट्रकवी तुकाराम साहित्य पुरस्कार

कवी सर्जेराव चव्हाण यांना ‘ राष्ट्रकवी तुकाराम साहित्य पुरस्कार

*कवी सर्जेराव चव्हाण यांना ‘ राष्ट्रकवी तुकाराम साहित्य पुरस्कार .*

बुलढाणा ) येथिल जेष्ठ कवी ‘ लेखक सर्जेराव चव्हाण ‘ यांना यंदाचा ‘ संजीवनी ‘ संस्थेचा सन्मानाचा ‘ राष्ट्रकवी तुकाराम साहित्य पुरस्कार २०२४ साठी निवड करण्यात आली आहे . सदर पुरस्कार वितरण जून मध्ये दि . ६ / ६ /२० २४ रोजी केळवद गावी होणार आहे .

साहित्य क्षेत्रात गाजलेले . ‘आपण गाफील राहीलो तर .. या काव्यसंग्रहाचे लेखक कवी सर्जेराव चव्हाण हे जुन्या पिढीतील अभ्यासू लेखक असून त्यांना यापूर्वीच मुक्त विद्यापिठाचा विशाखा काव्य पुरस्कार ‘ कामगार कल्याण मंडळाचा ‘ गुणवंत कामगार पुरस्कार ‘ एकलव्य पुरस्कार ‘ पुर्णा येथिल ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार ‘ सोलापूरचा – काव्यसाधना पुरस्कार ‘ अंकूर चा अक्षरतपस्वी पुरस्कार ‘क्रांती ज्योती पुरस्कार ‘ पुणे येथिल सत्यशोधक केळवद येथिल शाहीर अमर शेख साहित्य आदी पुरस्कार ‘ मिळाले असून सत्यशोधक चळवळ ‘ फुले ‘शाहू आंबेडकर ” चळवळ लेखन शिबीरे ‘ कवि संमेलने साहित्य संमेलने यात सहभागी असून अखिल भारतीय साहित्य संमेलनातही निमंत्रीत कवी म्हणून हजेरी लावली आहे . आकाशवाणी ‘ दुरदर्शन या वर अनेक वेळा काव्य वाचनाचा कार्यक्रम सादर झाला आहे . सर्जेराव चव्हाण वयाच्या ७५ वर्षीही जोमाने काव्य सादर करतात . पुस्तके वाचतात लिहीतात . नवीन साहित्य पिढी युवक नवलेखक यांना मोलाचे मार्गदर्शक करणारे सर्जेराव चव्हाण बुलढाणा जिल्ह्याचे ‘ साहित्य भूषण आहेत . त्यांच्यावर साहित्य क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा