You are currently viewing उद्योजक बनण्याची वेगवेगळी दालने आत्मसात करा

उद्योजक बनण्याची वेगवेगळी दालने आत्मसात करा

उद्योजक बनण्याची वेगवेगळी दालने आत्मसात करा

कॉयर बोर्ड च्या सेमिनार कार्यक्रमात केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचे आवाहन

कणकवली

उद्योजक बनण्याची मानसिकता तयार करा.जगात अशक्य काहीच नाही. काथ्या पासून बनविलेल्या वस्तूंची १८ हजार कोटी ची उलाढाल प्रती वर्षी होते. ४००० कोटी ची उत्पादने देशाबाहेर परदेशात विकली जातात.२५०० कोटीची अगरबत्ती परदेशात विकली जाते. या संपूर्ण प्रक्रियेत आपण कोठे आहोत याचा विचार केला पाहिजे. कोकणातील जनतेने या सर्वाचा फायदा घ्यावा. उद्योजक बनण्याची वेगवेगळी दाखने आहेत ती आत्मसात करावी.असे आव्हान केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.

केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत प्रहार भवन येथे कॉयर बोर्ड चा सेमिनार कार्यक्रम झाला. तर सुरुवातीला कॉयर बोर्डाच्या वस्तू प्रदर्शन दालनाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर कॉयर बोर्ड चे चेअरमन डी कप्पूरामु, सेक्रेटरी जे.के. शुक्ला,मार्केटिंग झोनल ऑफिसर पी. जी. तोडकर, जनरल ऑफिसर गीता भोईर, मॅनेजर श्रीनिवास बिटलिंगु,असिस्टंट मॅनेजर गड्डम स्वामी, सेल्समन राधिका पावसकर, बाजीराव सानप, डॉक्टर सचिन बदाने, बन्सीधर भोई आदी उपस्थित होते.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अपेक्षित उद्योजक घडत नाहीत. अशी खंत व्यक्त करतानाच केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी २०० पेक्षा जास्त महिला कॉयर मध्ये उद्योग करण्या साठी पुढे आल्या याचे मला समाधान आहे.असे सांगितले

नारळ आणि कॉयर त्याच्या सापून बनविण्यात येणारी उत्पादने फारच उपयोगी आहेत. अनेक उत्पादने घेता येतात त्याचा वापर बँकेत पैसे जातील असा केला पाहिजे.यापुढे तो वापर केला जाईल अशी अपेक्षा करतो.मी ओसरगाव मध्ये महिला भवन उभारले आज घडीला तेथे अनेक फळांपासून उत्पादने बनवली जात आहेत.महिलांना स्वतःची उत्पादने घेता येत आहेत.त्याच पद्धतीने कॉयर क्षेत्रात अनेक उत्पादने घ्या आणि स्वावलंबी बना असे आवाहन केले.

चहा पत्ती पासून बनलेले तेल ९०० रुपये लिटर विकले जाते.बांबू पासून इथोनोल बनविले जाणार आहे.त्यामुळे या सर्वांचा विचार करा आणि या उद्योगात सामील व्हावा. पैसा मिळविण्याच्या मार्गाने चाला. त्यासाठी चागला मार्ग आम्ही दाखवत आहोत त्याचा वापर करा. आणि उद्योग करा. गरिबातील गरीब माणूस आज श्रीमंत झाले. रस्त्यावर कपडे विकणाऱ्या माणसाने २ हजार करोड रुपयांचे भागभांडवल केले. तुम्ही सुध्दा अशाच पद्धतीने काम करा.नोकरीवर अवलंबून राहू नका. नोकरीत १५ हजार रुपये मिळतात त्यावर अवलंबून राहू नका.धीरूभाई अंबानी यांनी १५०० रु.भागभांडवल घेवून व्यवसाय सुरू केला होता. आज त्या कंपनीचे ८ लक्ष कोटी रुपयांचे भागभांडवल आहे.असे यशस्वी व्हा. तुम्ही दोनशे लोक आहात.तुमची आसोशियेशन केले जाईल. ज्यामुळे तुमचे जे प्रॉब्लेम असतील ते त्या माध्यमातून सोडवू .


मी सुद्धा व्यावसायिक आहे.रात्र शाळेत शिकलो. छोटे मोठे व्यवसाय केले.व्यवसायिक म्हणून काम करतो राजकारणातून पैसे मिळवतात नाही. वडीलांच्या नावे तातू राणेट्रस्ट केली आहे त्यात जे व्याज येते त्यातून मुलांना शिक्षणासाठी,उपचारासाठी मदत करतो. जे माझ्यावर टीका करत आहेत ते एक रुपया तर जनतेसाठी खर्च करत आहेत काय ? असा सवाल केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला,.

 

बॉक्स

*कॉयर बोर्ड साठी प्रहार भवन ची जागा पूर्णतः मोफत,एकही रुपया भाडे नाही; सेक्रेटरी जे.के. शुक्ला*

भाषणादरम्यान केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आपल्यावर विरोधक करत असलेल्या टीकेचा समाचार घेतला. मी पदाचा फायदा उठवणारा माणूस असतो तर प्रहार भवन ची ही जागा कॉयर ऑफिस साठी मोफत दिली असती काय ? असा सवाल करताच, कॉयर बोर्ड चे सेक्रेटरी जे.के. शुक्ला यांनी उभे राहत मंत्री राणे साहेब यांनी


कॉयर बोर्ड उत्पादन वाढव, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला त्याचा फायदा व्हावा. म्हणून गेल्या दोन वर्षे कणकवली प्रहार भवन येथे सुरू असलेल्या या कार्यालयाला दिलेली जागा एकही रुपया भाडे न घेता मोफत दिलेले आहे. असे जे.के. शुक्ला यांनी सांगितले.त्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

WhatsAppFacebookTwitterTelegramShare

प्रतिक्रिया व्यक्त करा