You are currently viewing शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जण निर्दोष

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जण निर्दोष

मालवण

शासनाचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पडेल ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच रूपाली तानावडे, ग्रामसेवक अनिल कांबळी यांच्यासह पाच जणांची जिल्हा न्यायालयाकडून सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. हा निर्णय घेण्या कामी ॲड परिमल नाईक, प्रकाश बोडस, अशपाक शेख़ यांनी कायदेशीर परिश्रम घेतले.

या दोघांनी शहीद होलसेकर, विश्वनाथ मिठबांवकर व मिथिलेश सुकी यांच्याशी संगनमत करून शासनाची तब्बल ५ लाख ८ हजार एवढ्या रकमेची फसवणूक केली होती. याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतचा दावा जिल्हा न्यायालयात सुरू होता. मात्र सबळ पुराव्याबाबत त्यांची मुक्तता करण्यात आली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा