*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
समाजभान
ऋण हे समाजाचे, फेडावयाचे आहे
नाते माणुसकीचे, जोडावयाचे आहे||१||
जगाकडून घेतो किती, मोजता ही न येते
काहीतरी जगाला पण, द्यावयाचे आहे ||२||
केवळ विचार स्वतःचा, प्राणीही करत राहतो
स्वार्थाचे हे कुंपण, तोडावयाचे आहे||३||
दुःखात दुसऱ्याच्या, व्हावे आपण सहभागी
अश्रू कुणाचे तरी, पुसावयाचे आहे || ४||
जसा उन्हात वृक्ष, देतो सर्वांना छाया
तसेच आपण आता, जगावयाचे आहे || ५||
अंधार या जगी जो, अज्ञान- भेदावयाचा
ज्ञानाचे दीप तिथे, लावावयाचे आहे ||६||
नकोत फक्त वाटा, हव्या आहेत सेवा
कर्तव्य आपले हे, स्मरावयाचे आहे ||७||
‘मी’ पणा विसरून, व्हावे आता ‘आपण’
समाजभान मनी, जागवायचे आहे ||८||
सौ .स्नेहा धोंडू नारिंगणेकर
शिरोडा ,सिंधुदुर्ग
