*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ऐक माणसा…*
सुधर सुधर रे सुधर माणसा सवयी चांगल्या लावून घे
जगणे मरणे नाही हाती जिणे चांगले निवडून घे
देवाघरचे वाण आपुले बट्टा त्याला लावू नको
घरादाराची राखरांगोळी सट्टा असा खेळू नको…
कशास प्यावी दारू राजा मरण ओढवून का घेतो
परणून आणली नवरी म्हणूनी छळवाद का मांडतो..
उघड्यावरती घरदार रे कुत्रेही विचारत नाही
कवडीमोल रे होते आयु झिजून मरते मग आई…
वाताहत रे मुले लेकरे भविष्य अंधारी जाते
भाऊबंधही दूर दूर रे उरत नाही मग नाते
जो तो टाळतो दूर मग जातो दोष तयांचा सांग बरे
तुला वाटते मीच बरोबर माझेच सारे आहे खरे..
सरळ वागणे सरळ चालणे समाज मग माने त्यास
नीतिने चालता अडथळे भले कितीही हो त्रास
नीतिचा मार्ग असो कठीण रे कधीच त्याला सोडू नये
देव परीक्षा घेतो घेऊ दे मनी नसावी कोणती भये…
चोऱ्यामाऱ्या उचलेगिरीने दररोज वाढते बघ पाप
समाधान ते खोटेनाटे रोजच डोक्याला ताप
काय मी करतो कळते आपणा मोठेपणाला भुलू
नये
जे नाही आपले ते घेऊन खोटेपणा तो मिरवू नये..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
