You are currently viewing श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १२३ वे

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १२३ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।।गण गण गणात बोते। जय गजानन श्री गजानन ।।

__________________________

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १२३ वे

अध्याय – २० वा , कविता – ३ री

__________________________

माधव मार्तंड जोशी सरकारी कामाला।आले कळंब कसूर गावाला । काम झाले, वाटले त्याला । जावे दर्शनास शेगावाला ।।१ ।।

 

त्याने सूचना केली शिपायाला । दमणी तयार करण्याला।

म्हणाले, जायचे आहे आपल्याला। दर्शनास शेगावाला ।।२।।

जोशी दमणीत बसला । नदीपात्रात उतरला । अचानक

मुसळधार पाऊस सुरू झाला । नदीला मोठा पूरही आला ।।३।

झंझावात सुरू झाला । शिपाई जोशी साहेबास बोलला ।

उपाय नाही आता उरला । यातून सुटकेचा ।।४ ।।

 

जोशी घाबरले मनोमनी । केली स्वामींची विनवणी ।

स्वामी, वाचवा या संकाटातूनी । तुम्हीच आमुचे त्राता ।।५।।

 

शिपायास जोशी बोले । स्वामींचे भजन पाहिजे केले ।

स्वामीं रक्षणकर्ते आपुले । संकट समयासी ।६ ।।

 

तसेच झाले । भक्तच्या रक्षणा स्वामी धावले ।

जोशी सुखरूप पैलतीरी आले । शेगावी आले स्वामीकृपेने ।।७ ।।

 

समाधी दर्शन झाले । जोशी संतोषले । बाळाभाऊजवळ

पैसे दिले । म्हणाले, ब्राम्हण-भोजन घालावे ।।८ ।।

********

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

___________________________

कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे- पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा