*ज्येष्ठ लेखक कवी पत्रकार बाबू फिलिप्स डिसोजा कुमठेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*राजकीय चारोळी*
यांचे वार त्यांचे पलटवार
विरोधक शोधती संधी अशी
मुद्द्यांवर गुद्द्यांचे कारभार
लोकशाही हताश मिंधी कशी
-१-
लोकसंख्येपेक्षा मतदान अधिक
मेलेल्यांनी केले मतदान अचंबा
ईव्हीएम यंत्रे होतात आता हॅक
खऱ्या मतदारांचा मात्र खोळंबा
-२-
वाढवले होते जीएसटी चे दर
मनमानी बहुमताच्या जोरावर
अमेरिकेचा टॅरिफ धक्का जबर
जाहीरातींनी घेती आता श्रेय वर
-३-
सरन्यायाधीशांवर बूट फेक
सनातनींचा लपत नाही बेत
सरकार कारवाईला कसे मूक
लोकशाही अजून कशी अचेत
-४-
बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
पुनावळे पुणे ३३
