*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्री स्वामी समर्थ काव्य वंदना काव्यपुष्प- २६ वे*
_________________________
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
************
सैरावैरा आमुचे मन धावे । याला तुम्हीच रोकावे । शांत करावे । स्वामी समर्था ।। १ ।।
कच्छ-त्रिविक्रम देवालय क्षेत्री राहिले । तिथुनिया पुढे निघाले । क्षेत्र द्वारकापुरीला येणे जाहले । श्रीकृष्ण-दत्तात्रय-नृसिंहमुनी” नावाने स्वामी इथे परिचित झाले ।। २।।
इथे एक जन्मांध तपस्वी साधू रहात होते । नाव त्यांचे सूरदास असे होते । साधू,श्रीकृष्ण दर्शनाची आस मनी
बाळगून होते ।परी साधनेस फळ येत नव्हते ।। ३ ।।
त्या साधूच्या आश्रमात स्वामी गेले । त्यास बोलले ।
ज्याच्या दर्शनास मन तुझे आतुरले । तो मी, समोर तुझ्या उभा आहे ।। ४ ।।
स्वामींनी हस्त-स्पर्श केला । अंध सुरदासाच्या डोळ्याला।
डोळे उघडताच सुरदासाला । द्वारकाधिश श्रीकृष्ण दिसू लागला ।। ५ ।।
या सुरदासाला । त्रिविध तापातून मुक्त केला । भक्त उद्धरीला । स्वामींनी ।। ६ ।।
**********
करी क्रमशः हे लेखन कवी अरुण दास
___________________________
कवी अरुण दास- अरुण वि.देशपांडे -पुणे.
___________________________
