*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*खाऊ घालतो वडापाव*
(चाल: उघड दार देवा आता..)
पुरे करा देवा आता,
पुरे करा देवा !! (धृ.प.)
कुजून गेला कांदा आतां
नको तेवढ पाणी
भिजून गेली हळद
विचारी ना कोणी…………….1
झोपल्याही केळी आता
लागल्या *घोरायला*
मजूर मिळे ना कामाला
काय *गुन्हा* केला?…………2
कशास ठेवले जीवंत
नाही *पैका* गाठीला
दारी उभा *मारोती*
महाग झाला *शेंदूराला*……..3
डॉक्टर रहातो शहरात
मुडदे पडती *खेड्यात*
कां रे नाहीत ती *माणसे*
सर्व *पक्ष* दुर्लक्षितात……….4
हवे *दूध* गाईचे
जागा *नाही* शहरात
दूध *ढापून* वासराचे
चढ्या *दराने* विकतात…….5
करोनिया *थट्टा* देवा
मिळते *काय?* सांग
देवा *तुझ्या* दारी
असे श्रीमंताची *रांग*……….6
भाजीपाला हवा म्हणून
पळत सूटती *खेड्यात*
मोजुनिया दिडक्या जादा
अढी उपकाराची डोक्यात….7
नाही कां रे आंम्हा *पोट*
झोपतो घेऊन *चिरगुट*
नाही *नशीबी* रजई
बोचेल कां रे *ब्लॅन्केट?*..8
थाटमाट सगळे देवा
शहर वासीॅचे *उशाशी*
*दिसत नाही* पोट आमचे
झोपतो सदा *उपाशी*….9
अती झाले आतां देवा
विनवितो *एक* डाव
थांबव बरसणे *आता*
*खाऊ घालतो “वडापाव”*..10
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157

