*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”वन वैभव”*
वन राष्ट्र वैभव संपत्ती आहे महान
तुकोबा म्हणती वृक्षवेली सोयरे जाणIIधृII
जाणावे वृक्षवेलींचे उपकार अनंत
निरपेक्ष अन्न वस्त्र निवारा पुरवीत
हवा शुद्ध होई रक्षिते पर्यावरणII1II
वृक्षवेलींची सर्वत्र करावी लागवड
पंचमहाभूते समतोलती वातावरण
वृक्ष वेली सांभाळती जमिनीचा पोतII2II
जळाचे बनती मेघ बरसे पर्जन्य
एकमेकांना पूरक चक्र निसर्ग दत्त
वाचवावे वृक्षवेली वणवे आगी पासूनII3II
वनौषधी माणसाला आहे वरदान
सौष्ठव उत्पन्न मिळे नैसर्गिक पर्यटन
राष्ट्रीय संपत्तीचे करावे रक्षण जतनII4II
काव्य:श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.

