You are currently viewing राष्ट्रीय संघर्ष समिती जनजागृती अभियान देवगड येथे २२ एप्रिल रोजी मार्गदर्शन बैठकीचे आयोजन !

राष्ट्रीय संघर्ष समिती जनजागृती अभियान देवगड येथे २२ एप्रिल रोजी मार्गदर्शन बैठकीचे आयोजन !

राष्ट्रीय संघर्ष समिती जनजागृती अभियान देवगड येथे २२ एप्रिल रोजी मार्गदर्शन बैठकीचे आयोजन !

देवगड
पेन्शनधारकांच्या आर्थिक सुरक्षिततेला सुरुंग लावून पेन्शनधारकांना जीवन जगणे असंभवनीय व
दयनीय करून ठेवले आहे व त्यामुळे अतिशय हालाखीचे आणि उपेक्षित, मृतप्राय जीवन
पेन्शनधारकांना जगावे लागत असून त्यांचेवर अन्याय झाला आहे. या अन्यायाविरुद्ध EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय कमांडर अशोक राऊत यांच्या सक्षम नेतृत्वाखाली EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समिती गेली १० वर्षे देशपातळीवर रात्रंदिवस लढा देत आहे.
सर्व प्रकारची सर्व स्तरावर आंदोलने करीत आहे. भेटीगाठी, पत्रव्यवहार करत आहे. तरीही ‘गोड
बोलून वाटाण्याच्या अक्षता लावणे’ आणि ‘आश्वासनाव्यतिरिक्त काहीही पदरात पडले नाही. सबब

सर्वांच्या मनात सकारात्मकता निर्माण होऊन संघटन, बळकटीकरण, विस्तारीकरण आणि
EPS-95 पेन्शनधारकांचे जागृतीकरण अभियान राबविण्याचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून
मंगळवार दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी EPS-95 पेन्शनसंबंधी माहिती देण्यासाठी EPS-95
राष्ट्रीय संघर्ष समितीचे पुणे जिल्हा समन्वयक अजितकुमार घाडगे येणार आहेत. तरी
मंगळवार दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी देवगड तालुक्यातील व देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग परिसरातील

बहुसंख्य EPS-95 पेन्शनधारक सभासदांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा
देवगड, येथे सकाळी १०.०० वाजता उपस्थित राहावे.
असे आवाहन गुरुनाथ लोंबर,चंद्रहास मर्गज दत्ताराम आरेकर विनायक महाडीकता. देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समिती देवगड जिल्हा सिंधुदुर्ग
दिनांक १८ २०२५ देशातील सुमारे १८७ विविध उद्योग धंद्यातील कर्मचान्यांना सेवानिवृत्तीनंतर उतारवयात
आर्थिक सामाजिक सुरक्षा या तूने भारतीय राज्यघटनेनुसार केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा १९५२ अमलात आणला व त्यामध्ये वेळोवेळी अनेक दुरुस्त्या नंतरच्या
काळात झाल्या. कायदे झाले व त्या कायद्याचे एकत्रीकरण करून त्यातून EPS 1995 पेन्शन योजना
तयार करण्यात आली व त्याची अंमलबजावणी १६ नोव्हेंबर १९९५ पासून सुरू केली. तथापि ही
योजना सुरू करताना जी आश्वासने दिली होती त्याला फाटा देऊन पेन्शन योजनेतील पेन्शनधारकांच्या आर्थिक सुरक्षिततेला सुरुंग लावून पेन्शनधारकांना जीवन जगणे असंभवनीय व दयनीय करून ठेवले आहे व त्यामुळे अतिशय हालाखीचे आणि उपेक्षित, मृतप्राय जीवन

पेन्शनधारकांना जगावे लागत. असून त्यांचेवर अन्याय झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा