You are currently viewing मोबाईलवर रिल्स पाहण ही धोक्याची घंटा

मोबाईलवर रिल्स पाहण ही धोक्याची घंटा

*मोबाईलवर रिल्स पाहण ही धोक्याची घंटा*

*पालकांनी पाल्यांशी संवाद वाढवण गरजेचं*

कुडाळ :

आपल्या घरात आपण जसं वागाल तसंच मुलं वागतील, परंतु आपण मुलांना काय देतोय? यांची काळजी घेणे आवश्यक आहे. भारतीय लोक रोज पाच तास रिल्स बघत आहेत, ही धोक्याची घंटा आहे. आता पुस्तकाचा संवाद कमी झाला आहे. मोबाईल हा एकांतपणा घालवण्यासाठीचे एक साधन आहे. सण, परंपरा का साजरे करतोय?, हे आपण मुलांना सांगितले पाहिजे. शिक्षकापेक्षा पालकांसोबत मुलं अधिक असतात. म्हणून पालकांनी पाल्यांसोबतचा संवाद वाढवावा. जेवताना मोबाईल, टिव्ही टाळलाच पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी पिंगुळी ग्रामपंचायत उपक्रमांतर्गत ‘ग्रामपंचायत आपल्या दारी.!’ आयोजित कार्यक्रमात आज केले.
ग्रामपंचायत पिंगुळी ग्रामपंचायत आपल्या दारी या उपक्रमांचा आज शुभारंभ जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत परमपूज्य सद्गुरु समर्थ राऊळ महाराज सभागृह पिंगुळी येथे करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे, राऊळ महाराज संस्थानचे उपाध्यक्ष दशरथ राऊळ, शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी सुलभा ठाकुर, विकास कुडाळकर, संत राऊळ महाराज कॉलेजच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, प्रेरणादायी वक्ते प्रा रुपेश पाटील, ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, ज्येष्ठ साहित्यिक भरत गावडे, सौ. जयश्री चिलवंत, विकास कुडाळकर, वर्षा कुडाळकर, सागर रणसिंग, मंगेश चव्हाण, मंगेश मस्के, आर्या बांदेकर, शशांक पिंगुळकर, केशव पिंगुळकर, सौ. ममता  राऊळ, सौ. अश्विनी गंगावणे, सौ. अंकिता जाधव, नूतन गावडे, ग्रामसेवक राजेश निवतकर, राजन पांचाळ, प्रसाद दळवी, आप्पा सावंत, गोविंद चव्हाण, सदाशिव गावडे, अश्विनी सावंत, स्वरा काळसेकर, ईशा सातार्डेकर, विनायक केरकर, सतीश माडये, वैभव धुरी, बाबली पिंगुळकर, सुभाष सावंत, श्रीमती योगिता, श्रीमती राणे, प्रिया पांचाळ, साधना माडये, रामदास सावंत, अरुण सावंत, मेघना सावंत, प्रिया आमडोसकर, नितीन पिंगुळकर, सागर वालावलकर, संदेश गावडे, बाळकृष्ण सडवेलकर, प्रवीण राऊळ, वैशाली राऊळ, मंडळ अधिकारी श्री. गुरव, साधना माडये, संपदा धुरी, माधवी मसके, मोहन पिंगुळकर तसेच परमपूज्य राऊळ महाराज सेवा ट्रस्ट, प. पू .विनायक अण्णा राऊळ महाराज सेवा ट्रस्ट,  गावातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वृंद,  सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, गावातील ग्रामस्थ, पालक वर्ग, गावातील सर्व ग्रंथाचे अध्यक्ष, प्रतिनिधी, महिला बचत गट यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले की, पालकांनी मुलांना मोबाईल घेवू नका हे सांगताना काय घ्या?, हे देखील सांगावे. पालकांनी मुलांशी मित्राप्रमाणे वागावे. ग्रामपंचायतीने आपल्या गावातील सुशीक्षित बेरोजगार, तसेच व्यावसायिक शिक्षण घेतलेले तरुण आदींचा गुगल अर्जाद्वारे डाटा गोळा करणे खूप गरजेचे आहे. कारण आपल्याकडील मुलांना काय हवे आहे तशा गरजेची पूर्तता आपल्याला करता येईल.

जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल म्हणाले की, आजच्या कार्यक्रमात घेतलेला परिसंवादमधील विषय निश्चितच कौतुकास्पद आहे. मुलासोबत पालकांनाही याची गरज आहे. रणजित देसाई म्हणाले की, पिंगुळी ग्रामपंचायतचा उपक्रम चांगला आहे. आजची मुले मोबाईलच्या विळख्यात न राहता पालक व शिक्षकाच्या माध्यमातून आपले हरवलेले बालपण पुन्हा आणण्यासाठी मैदानी खेळाकडे वळण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

तहसीलदार विरसिंग वसावे म्हणाले की, अलीकडे पालकांची जबाबदारी जास्त आहे. पालकचं हे मुलांचे पहिले गुरु आहे. पालकांनी मुलांकडे मोबाईल न देण्याचा निर्णय घेतला पाहिजे. मोबाईलमुळे मुलांची नवनिर्मीतीची क्षमता कमी झाली आहे. आजचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे श्री. वसावे यांनी सांगितले.

यावेळी पिंगुळी मधील सर्व शाळांच्या व्यवस्थापन समिती , मुख्याध्यापक व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. श्री देव महापुरुष वाचनालय व ग्रंथालय, शेटकरवाडी व श्री देवी भद्रकाली वाचनालय व ग्रंथसंग्रहालय, गुढीपूर पिंगुळी, श्री देव रवळनाथ वाचनालय, कै. मधु दंडवते वाचनालय आदिनी सहभाग घेतला होता.

आमदार निलेश राणे यांचा मुंबई दौरा असल्याने ते उपस्थित राहिले नाहीत. मात्र त्यांनी पिंगुळी ग्रामपंचायतच्या या स्तुत्य उपक्रमास भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविक शंशाक पिंगुळकर, निवेदन राजन पांचाळ व मंगेश मसके यांनी केले. सुरुवातीला जिल्हा परिषद शाळा गोंधयाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले तर पिंगुळी शेटकरवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. आभार स्वरा काळसेकर यांनी मानले. शेवटी पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा