*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
___________________________
श्री स्वामी समर्थ काव्य- वंदना, काव्यपुष्प -१३ वे
___________________________
श्री स्वामी समर्थांना करू वंदन । त्यांचे करू स्मरण ।
करू उपदेश-बोलांचे चिंतन । पालटेल मन आपुले ।। १ ।।
ताबा कधी आमचा नसतो ।शब्द जे आम्ही बोलतो ।
आमच्यावरच तो उलटतो । होते फजिती आमचीच ।।२ ।।
चंचल आमच्या मनाला । समर्था तुम्हीच लगाम घाला ।
आलो घेउनी या मनाला । चरणी माथा टेकवायला ।। ३ ।।
अक्कलकोटी येण्या आधी ती । स्वामींनी केली भ्रमंती ।
भारतभर ते फिरती । काश्मीर ते कन्याकुमारी ।। ४ । ।
केला त्यांनी प्रवास चौफेर । विविध ठिकाणी संचार ।
लौकिक त्यांचा झाला फार । सिद्ध-पुरुष म्हणती त्यांना ।।५।।
ग्रस्त- त्रस्त जनांना आधार दिला । संकटात भक्त रक्षिला।
कल्याण-मार्ग दाखविला । स्वामी समर्थांनी ।। ६ । ।
दुष्ट-प्रवृत्तीना सरळ केले । योग्य ते धडे शिकविले । जनांचे
अज्ञान दूर केले । भक्तवत्सल स्वामींनी ।। ७ ।।
**************
क्रमशः करी हे लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास – अरुण वि.देशपांडे- पुणे.
___________________________