*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वी. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। गण गण गणात बोते । जय गजानन- श्री गजानन ।।
__________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ८८ वे
अध्याय – १५ वा , कविता – ४ थी
___________________________
श्री गजानन विजय ग्रंथ नित्य वाचावा । स्वामी गजनानांचा संदेश घ्यावा । तो ध्यानात ठेवावा । आचरणासाठी ।। १ ।।
अध्याय पंधराव्यात । लोकमान्य सभा झाली अकोल्यात ।
त्याचा वृत्तांत । कथिला आहे श्रीदासगणूनी ।।२ ।।
टिळकांचे जाज्वल्य उद्गार । तो स्वराज्याचा हुंकार । देशभक्तीचा आविष्कार । सभेत ऐकीला जनतेने ।। ३ ।।
सभेमाजी टिळक झाले व्यक्त । शब्द त्यांचे ऐकुनी
स्वामी होती संचित । म्हणाले त्वरित । सरकार करिन
शिक्षा आता टिळकांना ।। ४ ।।
स्वामींचे वचन खरे झाले । फर्मान सरकारी सुटले ।
टिळकांना दोषी ठरवले । सुनावली शिक्षा तुरुंगवासाची ।। ५।।
स्वामी कोल्हटकरास म्हणती । हा प्रसाद भाकरीचा आहे टिळकांप्रति । या प्रसादाच्या बळावरती । होईल कामगिरी मोठी टिळकांच्या हातून ।। ६ ।।
***************
क्रमशः करी हे लेखन कवी अरुणदास
__________________________
कवी अरुणदास-
अरुण वि.देशपांडे- पुणे
__________________________