You are currently viewing १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या वाहतूक व्यवस्थेत कोणतीही हयगय नको – बाबूराव धुरी

१२ वी च्या विद्यार्थ्यांच्या वाहतूक व्यवस्थेत कोणतीही हयगय नको – बाबूराव धुरी

१२ वी च्या विद्यार्थ्यांच्या वाहतूक व्यवस्थेत कोणतीही हयगय नको – बाबूराव धुरी

दोडामार्ग

उद्या पासून जिल्ह्यात १२ वीच्या परीक्षा सुरू होत आहेत, यासाठी सर्व परीक्षार्थ्याना आपण शुभेच्छा देतो, आणि प्रशासनाला विनंती आहे की, सकाळी प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी योग्य ती सोय करावी, वाहतूक व्यवस्थेत कोणतीही हयगय करू नये, कोणाला काही समस्या असल्यास जवळील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केले आहे.

भविष्याची एक पायरी पुढे चढावी यासाठी १२ वी चे वर्ष महत्त्वाचे आहे, त्यासाठी उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ वी चे विद्यार्थी आपले नशीब आजमावत आहेत, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी जिल्हा वासियांसह प्रशासनाने सहकार्य करावे, कुणी विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर नेण्यास आपणाकडे सहाय्य मागत असेल तर त्याला परीक्षा केंद्रावर पोहचवा असे बाबुराव धुरी म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा