You are currently viewing काजू बी अनुदान योजनेस ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

काजू बी अनुदान योजनेस ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

काजू बी अनुदान योजनेस ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी

राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासनाकडून वित्तीय सहाय्य उपलब्ध करुन दिल्यास काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होईल, ही बाब विचारात घेऊन २०२४ च्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वीत केली होती. या योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनुदान योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त काजू उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य काजू मंडळ तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी केले आहे.

काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान देणे या योजनेची अंमलबजावणीची प्रक्रिया पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनुदान मागणीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज, संमतीपत्र, ७/१२, कृषी खात्याचा दाखला, जी.एस.टी.बील, बैंक तपशिल, आधारकार्ड, हमीपत्र इ. कागदपत्रे अनुदान मागणीसाठी आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे उपविभागिय कार्यालय, शांतीनगर, नाचणे, जि. रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा, अथवा कृषी व्यवसाय पणन तज्ञ पवन बेर्डे (७२१८३५००५४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज प्राप्त करणे तसेच जमा करण्याची सुविधा कुडाळ सुविधा केंद्र, एमआयडीसी कुडाळ, हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्र जामसंडे या ठिकाणी करण्यात आली आहे, याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा