You are currently viewing नित्या बहार..

नित्या बहार..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*नित्या बहार…*

 

व्यक्तित्व सादगीचे

ठेवून चालतो मी…

सर्वांप्रती सदिच्छा

ठेवून चालतो मी…।

 

इतरांस काय म्हणुनी

कसलाच दोष द्यावा…

अपुलेच जर मनाशी

ठेवून रोष आहे…।

 

मशगुल कशात कोणी

कोणी कशात येथे…

जगणे नशेत ऐसे

नाही मनात माझ्या…।

 

आशा अशी कुणाची

केली न फार केंव्हा…

भवती विवंचनांचा

तैसाच भार आहे…।

 

आयुष्य पावसाच्या

थेंबात चातकाचे!..

जीवन तयाप्रमाणे

जगतो सुखात आहे…।

 

येणार पानझड तर

फुटणार पालवीही!..

ठेवून अंतरंगी

नित्या बहार आहे…।

 

✍️शशांक दि. देशमुख©®

चांदुरबाजार, जि. अमरावती

(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४

प्रतिक्रिया व्यक्त करा