You are currently viewing जनता दरबारात ११४७ अर्ज, ५२१ प्रश्नांचा जागीच निकाल – रवींद्र चव्हाण

जनता दरबारात ११४७ अर्ज, ५२१ प्रश्नांचा जागीच निकाल – रवींद्र चव्हाण

जनता दरबारात ११४७ अर्ज, ५२१ प्रश्नांचा जागीच निकाल – रवींद्र चव्हाण;

उर्वरित प्रश्नांसाठी “टाईम बाँड”, २५ ते २७ सप्टेंबरला पुन्हा जनता दरबार…

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तिन्ही विधानसभा मतदार संघात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात तब्बल ११४७ प्रश्नांचे अर्ज दाखल झाले असून त्यातील ५२१ प्रश्न जागीच सोडविण्यात आले. तर उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला टाईम बाँड देण्यात आला आहे. त्यामुळे याचा रिव्हू घेण्यासाठी २५ ते २७ सप्टेंबर या कालावधीत पुन्हा जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजन तेली, संजू परब, विशाल परब, मनोज नाईक, युवराज लखमराजे, दिलीप गिरप यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा