You are currently viewing भारत १० वर्षांनंतर टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत, ऑस्ट्रेलिया पाठोपाठ इंग्लंडची शिकार

भारत १० वर्षांनंतर टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत, ऑस्ट्रेलिया पाठोपाठ इंग्लंडची शिकार

*भारत १० वर्षांनंतर टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत, ऑस्ट्रेलिया पाठोपाठ इंग्लंडची शिकार*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव करून टी२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकात ७ गडी गमावून १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १६.४ षटकांत १०३ धावांवर गारद झाला. २९ जून रोजी बार्बाडोस येथे भारताचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. भारतीय संघ तिसऱ्यांदा टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

यापूर्वी टीम इंडियाने २००७ आणि २०१४ मध्ये अंतिम सामना खेळला होता. दोन्ही आवृत्त्यांमध्ये महेंद्रसिंग धोनी कर्णधार होता. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया १० वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचली आहे. भारतीय संघ एका वर्षात सलग दुसऱ्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. याआधी टीम इंडियाने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकामध्येही अंतिम फेरी गाठली होती. त्याचबरोबर भारताने सलग दुसऱ्या आयसीसी स्पर्धेत इंग्लंडचा पराभव केला आहे. याआधी टीम इंडियाने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकामध्येही इंग्लंडचा पराभव केला होता.

तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्माच्या (५७) कमी उसळीच्या खेळपट्टीवर खेळलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने टी२० क्रिकेट विश्वाच्या पावसाने प्रभावित झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध ७ विकेट्सवर १७१ धावा केल्या होत्या. विराट कोहली (९) पुन्हा झटपट बाद होऊन तंबूमध्ये जाऊन बसला, पण रोहितला आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी भारताला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

पावसामुळे खेळ सुरू होण्यास १ तास १५ मिनिटे उशीर झाला. मध्यंतरी पुन्हा पावसाचा व्यत्यय आला आणि भारताची धावसंख्या ८ षटकांत २ गडी गमावून ६५ धावा झाली. कोहली आणि रोहित जेव्हा फलंदाजीला आले तेव्हा हे स्पष्ट झाले की खेळपट्टी संथ होती आणि कमी उसळीमुळे फलंदाजांसाठी कठीण होती. रोहित आणि कोहली या दोघांनीही डावाच्या सुरुवातीला रीस टोपली आणि जोफ्रा आर्चर या वेगवान गोलंदाजाच्या चेंडूवर फटके मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश मिळू शकले नाही.

गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची उत्सुकता दाखवणाऱ्या कोहलीने टोपली आणि आर्चर या दोघांविरुद्धही फटके मारण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. अखेरीस त्याने टोपलेचा एक पूर्ण लांबीचा चेंडू मिड-विकेटवर षटकारावर पाठवला. पण डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाच्या शॉर्ट लेंथ चेंडूवर बाद झाला. कोहलीने तोच स्ट्रोक ऑन साइड मारण्याचा प्रयत्न केला, पण तो त्रिफळाचीत बाद झाला. त्यामुळे स्पर्धेतील त्याच्या खराब कामगिरीमध्ये कमालीचे सातत्य राहिले.

त्याच वेळी, रोहितने परिस्थितीशी अधिक चांगले जुळवून घेतले आणि चेंडू उशिरा खेळण्याचा निर्णय घेतला. इतर फलंदाजांसाठी आदर्श ठेवत रोहितने टोपलीच्या तिसऱ्या षटकात सलग दोन चौकार मारले आणि त्यानंतर इंग्लंडचा मुख्य फिरकी गोलंदाज आदिल रशीदवर दबाव आणला. पॉवरप्लेमध्ये भारताने २ गड्यांच्या मोबदल्यात ४६ धावा केल्या होत्या. ऋषभ पंत (४) बाद होणारा दुसरा फलंदाज ठरला. सॅम करनच्या चेंडू त्याला समजला नाही आणि मिडविकेटवर झेलबाद झाला.

त्यानंतर रोहित आणि रशीद यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळाली. भारतीय कर्णधाराने या लेगस्पिनरच्या सुरुवातीच्या षटकात दोन चौकार मारले. पाऊस पडला तेव्हा सूर्यकुमार यादव १३ धावांवर फलंदाजी करत होता. पावसामुळे तासाभराहून अधिक काळ खेळ थांबला होता. पावसाने फलंदाजांची लय बिघडवली आणि या ब्रेकनंतर इंग्लंडने रशीद आणि लियाम लिव्हिंगस्टोनचा दोन्ही बाजूंनी चांगला उपयोग करून घेतला. पण त्यांना रोहित आणि सूर्यकुमारला रोखता आले नाही.

करनच्या १३व्या षटकात भारताने १९ धावा केल्या, ज्यामध्ये सूर्यकुमारने दोन षटकार मारले आणि रोहितने षटकार लगावत सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी ७३ धावांची भागीदारी केली जी रोहित रशीदच्या गुगलीवर बाद झाल्यावर तुटली. हार्दिक पांड्याने (१३ चेंडूत २३ धावा) खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला दोन षटकार मारून डाव पुढे नेला.

शिवम दुबेच्या आधी मैदानात उतरलेल्या रवींद्र जडेजाने (९ चेंडूत नाबाद १७) आर्चरच्या षटकात दोन महत्त्वाचे चौकार मारले. तर दुबे केवळ एक चेंडू खेळून बाद झाला. शेवटच्या षटकात अक्षर पटेलने ख्रिस जॉर्डनला षटकार मारत भारताला १७० च्या पुढे नेले. अखेरच्या ५ षटकांत संघाने ५३ धावा केल्या.

१७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडच्या संघाला कर्णधार जोस बटलर आणि फिल सॉल्टने वेगवान सुरुवात करून दिली. दोघांनी ३ षटकांत २६ धावा जोडल्या होत्या. यानंतर अक्षर पटेल गोलंदाजीसाठी आला आणि त्याने बटलर (२३), बेअरस्टो (०) आणि मोईन अली (८) यांना बाद केले. त्याचवेळी जसप्रीत बुमराहने फिल सॉल्ट आणि कुलदीप यादवने सॅम करनला (२) बाद केले.

२६/० पासून, इंग्लंडची धावसंख्या नवव्या षटकात ५ बाद ४९ अशी होती. यानंतर हॅरी ब्रूकने स्थिरावण्याचा प्रयत्न केला, मात्र कुलदीपने त्यालाही तंबूमध्ये पाठवले. ब्रूकने १९ चेंडूत सर्वाधिक २५ धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोन ११ धावा केल्यानंतर, ख्रिस जॉर्डन एक धावा करून, आदिल रशीद २ धावा करून आणि जोफ्रा आर्चर २१ धावा करून बाद झाले. भारताकडून अक्षर पटेल आणि कुलदीप यादवने तीन-तीन बळी घेतले. तर जसप्रीत बुमराहने दोन विकेट घेतल्या. अक्षरला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात शानदार कामगिरी करत ३६ चेंडूत अर्धशतक झळकावले. या स्पर्धेतील रोहितचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. याआधी रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर-८ टप्प्यातील संघाच्या अंतिम सामन्यातही अर्धशतक झळकावले होते.

यासह रोहित शर्माने ११व्यांदा टी२० विश्वचषकात आपले अर्धशतक पूर्ण केले. यासोबतच टी२० विश्वचषकात सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने या जागतिक स्पर्धेत आतापर्यंत १४ वेळा अर्धशतक झळकावले असून तो यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेलने या स्पर्धेत ९ अर्धशतके झळकावली आहेत. नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने या जागतिक स्पर्धेत ८ अर्धशतके झळकावली आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमांची मालिका करणाऱ्या रोहितची बॅट इंग्लंडविरुद्धही बोलकी झाली. त्याने टी२० विश्वचषकातील ५० वा षटकार ठोकला. या स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या पुढे असलेल्या ख्रिस गेलने ६३ षटकार ठोकले आहेत. यासह रोहित सर्व प्रकारांमध्ये कर्णधार म्हणून पाच हजार धावा पूर्ण करणारा पाचवा भारतीय कर्णधार ठरला आहे. रोहितपूर्वी विराट कोहली, मोहम्मद अझरुद्दीन, महेंद्रसिंग धोनी आणि सौरव गांगुली यांनी ही कामगिरी केली आहे.

इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीद आणि वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन यांनी टी२० विश्वचषकात इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत स्टुअर्ट ब्रॉडला मागे टाकले आहे. रशीदने रोहितला बाद करून ही कामगिरी केली. रशिद आणि जॉर्डनने या स्पर्धेत ३१ विकेट्स घेतल्या आहेत, तर ब्रॉडच्या नावावर टी२० वर्ल्ड कपमध्ये ३० विकेट्स आहेत.

उद्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

______________________________
*संवाद मिडिया* जाहिरात 

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/139227/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा