You are currently viewing अमरसेन सावंत यांनी आवाज उठविल्याने अणाव घाटचेपेड पुलाचे काम झाले पूर्ण

अमरसेन सावंत यांनी आवाज उठविल्याने अणाव घाटचेपेड पुलाचे काम झाले पूर्ण

*अमरसेन सावंत यांनी आवाज उठविल्याने अणाव घाटचेपेड पुलाचे काम झाले पूर्ण*

कुडाळ

महाविकास आघाडीच्या काळात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी अणाव घाटचेपेड पुल मंजूर करून त्यासाठी २ कोटी ६५ लाख रु मंजूर केले होते. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी पुलाचे काम अर्धवट स्थितीत असतानाच उदघाटन केले होते. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी पुलाच्या अपूर्ण कामाबाबत आवाज उठविल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ यावर कार्यवाही करून ठेकेदाराकडून पुलाच्या स्लॅबवर कार्पेट आणि जोडरस्त्याचे काम पुर्ण करून घेतले आहे. अमरसेन सावंत यांच्या कार्यतत्परतेमुळे अणाव आणि कुडाळ वासियांना न्याय मिळाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा